--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

नविन वर्ष ठराव.

आज नविन वर्ष सुरु झाल. काल नविन वर्षाच्या संध्याकाळी सर्व पक्षातल्या प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक झाली. सरत्या वर्षात गाजलेल्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फारच शांतपणे झाली. सर्व नेत्यांनी नविन वर्षात सामंजस्याने वागायचे ठरवले व यापुढे एकमेकांवर २०१० मध्ये झालेली चिखलफेक न करण्याचे ठरवले.
बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली व बहुतेक ठराव एकमताने संमत करण्यात आले. ते मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
१. नविन वर्षात कोणताही नविन घोटाळा करायचा नाही. सवयी मुळे एखादा घोटाळा झाल्यास त्यावर फार चर्चा न करता झालेला फायदा सर्वांनी सारखा वाटून घायचा.
२. कोणताही जूना मुद्दा या वर्षी उखरुन काढायचा नाही.
३. राष्ट्राच्या हिताचाच विचार मनात आणायचा. असा विचार मनात आणायला (सवय नसल्याने) बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. तितका वेळ सर्वांनी शांतता पाळायची. हा कालावधी किती असावा यावर फार गंभीरपणे चर्चा झाली. बैठकीच्या शेवटी असा कोणताही कालावधी लगेच ठरवणे शक्य नसल्याने एक सर्व पक्षीय समिती स्थापुन तोडगा काढायचे ठरवण्यात आले आहे.

ही बैठक अतिशय गुप्त होती यात इतरही विषयांवर चर्चा झाल्याचे कळते. सर्व मुद्दे कळल्यावर वाचकांना कळवले जाईल.

सर्वच आनंदात !

तीन मोठ्ठे राजकिय नेते दिल्लीला एकाच विमानात बसतात. विमान आकाशात जाते.

त्यातला सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणतो," मी शंभर रुपयाची नोट खाली फेकतो, ज्याला सापडेल तो खुष होणार."

विरोधी पक्षाचा नेता म्हणतो," दहा हजार फेका जास्त लोक खुष होतील."

तिसर्‍या पक्षाचा नेता म्हणतो," तुम्हीच विमानातुन उडी टाका अजुन जास्त लोक खुष होतील."

मागे बसलेला एक प्रवासी म्हणतो,"तुम्ही सर्वच उडी टाका, संपुर्ण भारत खुष होईल."

शिक्षण ?

एकदा एक वयस्क माणुस एका शाळेत गेला व मुख्याध्यापकांना म्हणाला," मला लिहीता वाचता येत नाही, मला शिकवाल का ?"

मुख्याध्यापक म्हणाले," हॊ आम्ही शिकवू, फक्त हा अर्ज भरुन द्या."

आनंदाची घटना !

एकदा एक सरदार मरण पावला.

त्याच्या अंत्यविधीची सर्व तयारी झाली. बॅंड बोलावण्यात आला. घरुन निघाल्यावर अंत्ययात्रेत सर्व बॅंडच्या तालावर नाचू लागले. भांगडा करु लागले.

रस्त्याने बघणारे नवल करत होते कि अशी अंत्ययात्रा कधी बघितली नाही.

राजाभाऊंनी एका सरदाराला बाजूला घेऊन विचारले," अरे ही अंत्ययात्रा असताना तुम्ही लोक असे का नाचताहात ?"

सरदार म्हणाला," पहिल्यांदाच कुणी सरदार ब्रेन ट्युमरने मेला, आता कोणी म्हणणार नाही सरदारांना ब्रेन नसते." आणी तो परत नाचायला लागला.

बरोबरी !

     एकवेळ संगणक मानवाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करेल पण मानवाच्या मुर्खपणाची बरोबरी करता येणार नाही !

प्रवास.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात येऊन गेल्यावर आपल्या लालू भैय्यांना आपण पण अमेरिकेला जावे असे वाटू लागले.
लालू भैय्यांनी विमानतळावर फोन करुन विचारले," अमेरिकेला जायचे असल्यास किती वेळ लागेल ?"

पलिकडून," एक मिनिट हं."

लालू भैय्या," धन्यवाद."

नजर !

"अरे तुझ्या काकांच्या बोटीला काय झाल ?", किशोर

महेश,"तुला तो समुद्रातला दगड दिसतोय ?"

किशोर,"होय."

महेश,"माझ्या काकांना नाही दिसला.  "

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...