"भारताचे पंतप्रधान माननीय मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांना फोन करुन ISI प्रमुखांना भारतात पाठवायला सांगीतले."
आचार्य अत्रे असते तर त्यांनी असा विनोद गेल्या १०००० वर्षात झाला नाही आणि पुढील १०००० वर्षात होणार नाही अशी प्रतिक्रीया दिली असती.
काय चाललय हे गेली दोन दिवस मुंबईत ?
सर्व बातम्यांचे चॅनल्स सर्व काही उघड दाखवत आहेत. अतिरेक्यांना NSG च्या सर्व हालचाली दाखवल्या जाताहेत. अशी बातम्यांची चॅनल्सना लगेच कायमची बंद करायला हवित.
कुठे आहे सरकार ?
याच बातम्यांमध्ये बर्याच अफवा पसरवल्या जाताहेत. याचा परिणाम मुंबईवर काय होतोय याचा कोण विचार करणार ?
फक्त वोट बॅंकेवरच अजुनही डोळा ?
सर्वांनी ठरवून अशा सरकारला पुढील निवडणुकीत घरचा रस्ता दाखवायला हवा.