--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: मुंबई
मुंबई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुंबई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

थैमान.


काल पुन्हा एकदा मुंबईत अतिरेक्यांनी घातलेल्या थैमाना नंतर आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला शांत रहाण्याचे आवाहन केले आहे.

महोदय, तुम्ही शांत बसा व आम्ही पण शांत बसतो.

या घटनेनंतर अतिरेक्यांचा निषेध करण्या ऎवजी आपण आपल्या राजकारण्यांचा निषेध करुया व या बॉंबस्फोटात मृत झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहूया.

सामान्य माणुस अजुन काय करु शकतो ?

ISI प्रमुखांना भारताचे आमंत्रण.

"भारताचे पंतप्रधान माननीय मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांना फोन करुन ISI प्रमुखांना भारतात पाठवायला सांगीतले."
आचार्य अत्रे असते तर त्यांनी असा विनोद गेल्या १०००० वर्षात झाला नाही आणि पुढील १०००० वर्षात होणार नाही अशी प्रतिक्रीया दिली असती.
काय चाललय हे गेली दोन दिवस मुंबईत ?
सर्व बातम्यांचे चॅनल्स सर्व काही उघड दाखवत आहेत. अतिरेक्यांना NSG च्या सर्व हालचाली दाखवल्या जाताहेत. अशी बातम्यांची चॅनल्सना लगेच कायमची बंद करायला हवित.
कुठे आहे सरकार ?
याच बातम्यांमध्ये बर्‍याच अफवा पसरवल्या जाताहेत. याचा परिणाम मुंबईवर काय होतोय याचा कोण विचार करणार ?
फक्त वोट बॅंकेवरच अजुनही डोळा ?
सर्वांनी ठरवून अशा सरकारला पुढील निवडणुकीत घरचा रस्ता दाखवायला हवा.

मुंबईवर अतिरेकी हल्ला.

काला रात्री पासुनचा मुंबईवरचा हल्ला बघून चिड येत आहे,
आम्ही आमचे काही मोहरे गमावून बसलो. आज घरी बसणार व उद्या परत कामावर, परवाची वाट बघत.
कधी पर्यंत असेच चालणार ?
गरज आहे पेटून उठायची या राजकारण्यां विरुद्ध.
साधा निषेध पुरेसा नाही.
उद्या तो अमर, लालू व सोनिया व असेच काही राजकारणी त्यांच्या भावंडांना का मारलं अस विचारण्या पुर्वीच व याची चौकशी करण्यात यावी हे म्हणण्या आधीच सांगुन टाकूया यांना घरी बसा अन्यथा पुढील निवडणुका आमच्या हातात आहेत.
असल्या राजकारण्यांना परत परत निवडून देणे म्हणजे अपमान आहे त्या शहिदांचा ज्यांनी या देशासाठी आपले प्राण वेचलेत.
करणार का त्यांचा अपमान वारंवार ?

माफी !

नमस्कार, मी या विमानाचा पायलट बोलतोय. आपण आमच्या कंपनीच्या विमानात मुंबई ते दिल्ली प्रवास करीत असल्याबद्दल धन्यवाद.

आपण सध्या ४०००० फुटांवर असून बाहेरच तापमान -४० अंश आहे. बाहेरचं वातावरण स्वच्छ असुन आपण सुरक्षीत आहोत. अरे SSSSSSS बापरे.............

( विमानात थोड्यावेळ स्मशान शांतता पसरते. काही वेळाने पायलट परत बोलतो. )

माफ करा आपल्याला कदाचित भिती वाटली असेल. पण मला कॉफीचा कप घेत असतांना धक्का लागला व गरम कॉफी पायावर पडली व त्याचा चटका बसला. आपण माझी पॅंट बघू शकता कॉफीने समोर पायावर खराब झाली आहे.

"आपण बघू शकता माझीतर माघून खराब झाली आहे. " एक प्रवासी ओरडला.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...