जोशी आजोबांना वय झाल्यामुळे दिसत नव्हते. आजींना जावूनही बरीच वर्षे झालीत. विरंगुळा एकच कोणातरी नातेवाईकाला पत्र लिहीणे.
असेच एकदा आजॊबा पोस्टात गेले. पोस्टकार्ड विकत घेतलं व जवळच बसलेल्या एका तरुणाला पत्र लिहून देण्याची विनंती केली, " बेटा मला निट दिसत नाही व हातही फार हलतो. मला एक पत्र लिहून देतोस कां ?
तरुण आजोबांना मदत करायला तयार झाला.
पत्र लिहून झाल्यावर आजोबांनी ते वाचले. आजोबांचा चेहरा बघून तो तरूण म्हणाला, " आजोबा काही चुकले कां ?"
"नाही बेटा नाही चुकले", आजोबा म्हणाले, " फक्त एक तळटीप घाल, वाईट हस्ताक्षरासाठी क्षमस्व."